स्पर्धेत टिकण्यासाठी ध्येय निश्चित करुन जिद्द आणि कष्टाच्या जोरावर प्रामाणिक प्रयत्न करावेत : मधुआप्पा देसाई
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
स्पर्धेत टिकण्यासाठी ध्येय निश्चित करुन जिद्द आणि कष्टाच्या जोरावर प्रामाणिक प्रयत्न करावेत : मधुआप्पा देसाई
कर्मवीर हिरे कनिष्ठ महाविद्यालयात गुणगौरव, बक्षिस वितरण समारंभ
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
सध्या क्षणाक्षणाला जगात बदलत होत आहे. दररोजचे जगणे तितकेच जलद झाले आहे. विद्यार्थ्यांनी भविष्यातील स्पर्धेत टिकण्यासाठी जीवनात नेमके काय करायचे आहे ते ध्येय ठरवावे. त्यानुसार जिद्द आणि कष्टाच्या जोरावर प्रामाणिक प्रयत्न करावेत, असे आवाहन श्री.मौनी विद्यापीठाचे चेअरमन मधुकर देसाई (आप्पा) यांनी केले.
श्री.मौनी विद्यापीठाच्या कर्मवीर हिरे कनिष्ठ महाविद्यालयातर्फे आयोजित गुणगौरव आणि बक्षिस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून मधुआप्पा देसाई बोलत होते. अध्यक्षस्थानी शासन नियुक्त प्रतिनिधी बाजीराव चव्हाण होते. कर्मचारी प्रतिनिधी डॉ. अरविंद चौगले, उपप्राचार्य डॉ. संजय देसाई, श्रीमती लतादेवी कल्याणकर, प्रा. सौ. जे. डी. साळवी प्रमुख उपस्थित होत्या.
यावेळी कला, वाणिज्य, विज्ञान विभागातून बारावी परीक्षेत क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. डॉ. एस. सी. इंगवले यांनी स्वागत केले. उपप्राचार्य एस. जे. जितकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अरविंद चौगले, श्रीमती लतादेवी कल्याणकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. पर्यवेक्षक ए. बी. पाटील यांनी आभार मानले. प्रा. एस. एस. वर्णे यांनी सूत्रसंचालन केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
