आपला पाल्य सुरक्षित रहायचा असेल तर प्रत्येक मातेने आपल्या पाल्याशी मैत्रीपूर्ण संवाद ठेवावा : डॉ. विलास पाटील
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
आपला पाल्य सुरक्षित रहायचा असेल तर प्रत्येक मातेने आपल्या पाल्याशी मैत्रीपूर्ण संवाद ठेवावा : डॉ. विलास पाटील
आम.भोईटे विद्यालयात माता पालक मेळावा संपन्न
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कसबा वाळवे
आजूबाजूला घडत असलेल्या घटनापासून आपला पाल्य सुरक्षित रहायचा असेल तर प्रत्येक मातेने आपल्या पाल्याशी मैत्रीपूर्ण संवाद ठेवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सारथी शिष्यवृत्तीचे माजी प्रकल्प संचालक व कोल्हापूर विभागाचे सारथी शिष्यवृत्ती प्रमुख डॉ. विलास पाटील यांनी केले.
आमदार श्री.नामदेवराव भोईटे माध्यमिक विद्यालय, कसबा वाळवे (ता. राधानगरी) या शाळेत आयोजित माता -पालक मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून सारथी शिष्यवृत्तीचे माजी प्रकल्प संचालक व कोल्हापूर विभागाचे सारथी शिष्यवृत्ती प्रमुख डॉ.विलास पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अशोक फराक्टे होते.
डॉ.विलास पाटील पुढे म्हणाले, पाल्य शिकतो म्हणजे नेमके काय करतो हे त्याच्या आचार, विचार, संचार या वृत्तीतून मातांनी ओळखले पाहिजे. आपल्या पाल्यांचे मन व मनगट निरोगी व सदृढ बनवायचे असेल तर त्याला पुस्तके वाचायला द्या. पुस्तकाने मस्तक सुधारते, अविचार मनातून निघून जातात. स्वतः आपण त्याच्याबरोबर अभ्यास करा.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. चंद्रकांत पाटील, संचालक श्री. विनायक कुलकर्णी, विश्वासराव घाटगे, मुख्याध्यापक श्री. सुरेश संकपाळ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माता पालक समिती सदस्या व माता मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रारंभी स्वागत श्री. बाजीराव सुतार यांनी तर आभार माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. सुमित्रा भोईटे यांनी मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
