मेन राजाराममध्ये रानभाज्या महोत्सव उत्साहात साजरा
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
मेन राजाराममध्ये रानभाज्या महोत्सव उत्साहात साजरा
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कोल्हापूर येथे कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सध्याच्या जंकफूड, फास्ट फूडच्या जमान्यात औषधी पालेभाज्यांचा वापर आहारात कमी होताना दिसत आहे. वेगवेगळ्या असणाऱ्या पालेभाज्या, त्यांचे दैनंदिन जीवनात महत्व, आवश्यकता काय आहे याची माहिती काॅलेजचे प्राचार्य डॉ.गजानन खाडे यांनी विद्यार्थ्यांना दिली.
या महोत्सवामुळे कला शाखेतील विद्यार्थी भविष्यात करिअर सुद्धा करू शकतात, त्यानुसार ही या उपक्रमाकडे सकारात्मक दृष्टीने पाहता येऊ शकते. भाज्यातील असणारी जीवनसत्त्वे आपली प्रतिकारशक्ती वाढवते. पोषक घटक शरीराला ऊर्जा, शक्ती ताकद देतात. या हिरव्या पालेभाज्यांचा वापर आहारात करणे हितावह आहे. याविषयी माहिती वर्गशिक्षिका सुषमा पाटील यांनी दिली. यामध्ये चैत्राली साखरे (दोडका व दोडक्याची चटणी) अंकिता माने (शेपू व चाकवत) श्रुतिका कोंडा (पालक) पूनम कुंभार (मेथी) विजयलक्ष्मी पवार (भेंडी ,पातरी) आयेशा मुजावर (लालपोकळा) सुप्रिया तिबिले (नाल व कुर्डू) प्रणाली पाटील (तांदळीची भाजी) श्रुतिका दुबुले (शेवगा व भोपळा) ऋषाली कांबळे ( मोहोर व कांदापात) श्रद्धा कोळी (अंबाडा) साक्षी पाडेकर (आळू, चाकवत) , आशिष चौगुले (शेपू) पृथ्वीराज शेंडगे (भोपळा, चवळी) इंद्रजीत गवळी (मुळा)तन्मय माने (मोहरी) सुमित भोळे (कंदमुळा) राजवर्धन रानगे (अंबाडा) प्रिन्स कुमार पासवान (चवळी) या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उस्फुर्त सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांचे कॉलेजचे प्राचार्य उप प्राचार्य सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.या उपक्रमाचे स्वागत वर्ग प्रतिनिधी मोक्षदा चोपडे व आभार श्रुतिका कोंडा या विद्यार्थ्यांनी मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
