मुंबई येथील सुभद्राबाई शिक्षण निधी या संस्थेच्यावतीने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६५० विद्यार्थ्यांना ३४ लाख ६२ हजार शिष्यवृत्तीचे वाटप
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
मुंबई येथील सुभद्राबाई शिक्षण निधी या संस्थेच्यावतीने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६५० विद्यार्थ्यांना ३४ लाख ६२ हजार शिष्यवृत्तीचे वाटप
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, राजापूर
मुंबई येथील सुभद्राबाई शिक्षण निधी या संस्थेच्यावतीने चालू शैक्षणिक वर्षांत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६५० हुशार गरिब होतकरु विद्यार्थ्यांना रु.३४,६२,००० (चौतीस लाख बासस्ट हजार) इतक्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. शिष्यवृत्ती वितरणाचे हे ४८ वे वर्ष आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी हा शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रम कुडाळ येथे तर रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी लांजा येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुधीर रघुनाथ सिनकर, उपाध्यक्ष संजीव मनोहर साखळकर, सचिव सुभाष राजाराम कुलकर्णी, श्रीम.स्वाती सुभाष कुलकर्णी, श्रीम.सुमेधा सुधीर सिनकर, सि. ए. सिद्धार्थ सिनकर, श्रीम.श्रद्धा सिनकर आदी संस्थाचालक उपस्थित होते.
या शिष्यवृत्तीमध्ये सर्वसाधारण शिष्यवृत्ती, विशेष गुणवत्ताधारक शिष्यवृत्ती, कर्जाऊ शिष्यवृत्ती, व संस्थाना सहाय्य अशा शिष्यवृत्तींचा समावेश आहे. ही शिष्यवृत्ती इयत्ता दहावी नंतर पुढे, अकरावी ते पदवी पर्यत शिकणाऱ्या तसेच इतर कोणत्याही शासनमान्य अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाते. मात्र त्या विद्यार्थ्यांनी आपण शिकत असलेल्या अभ्यासक्रमाच्या मागील वर्षात किमान ६०%गुण मिळवणे आवश्यक आहे. या शिष्यवृत्तीबाबतची जाहिरात विविध वृत्तपत्रातून, तसेच इंटरनेटवर दरवर्षी जून या महिन्यात प्रसिद्ध केली जाते. इंटरनेटवर अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३०सप्टेंबर असते. याबाबत अधिक माहिती www.subhadrabaishikshannidhi.com या वेबसाईटवर पहावी. असे आवाहन अध्यक्ष सुधीर सिनकर व सचिव सुभाष कुलकर्णी यांनी केले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
