*वन्य प्राण्यांना मानवतेची वागणूक द्या : वनपाल अमोल चव्हाण*
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
*वन्य प्राण्यांना मानवतेची वागणूक द्या : वनपाल अमोल चव्हाण*
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, पिंपळगाव
वने वाचली, जैवविविधता टिकली तरच वन्य प्राणी आणि पर्यावरण टिकेल. वन्य प्राण्यांना मानवतेची वागणूक द्या, असे प्रतिपादन वनपाल श्री.अमोल चव्हाण यांनी केले. बेगवडे (ता.भुदरगड) येथील श्री.लक्ष्मी विद्यालय येथे वन्यजीव सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याद्यापक प्रकाश येजरे होते.
यावेळी साहित्यिक, पत्रकार संजय खोचारे यांनी जैवविविधते बद्दल मार्गदर्शन केले. यावेळी आनंदा पाटील, प्रकाश देसाई, वनरक्षक वर्षा तोरसे, एम.एस.कांबळे, दत्ता जाधव यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. प्रारंभी प्रास्ताविक देवदास सावंत यांनी केले. तर आभार सचिन परीट यांनी मानले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





