अक्षरसागर साहित्य पुरस्कारासाठी १ जानेवारी २०२४ ते ३० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत प्रकाशित पुस्तकांच्या प्रती पाठविण्याचे आवाहन
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
अक्षरसागर साहित्य पुरस्कारासाठी १ जानेवारी २०२४ ते ३० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत प्रकाशित पुस्तकांच्या प्रती पाठविण्याचे आवाहन
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
अक्षरसागर साहित्य मंचच्या वतीने अक्षरसागर साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके मागविणेत येत असून कादंबरी, कथा कविता, बालसाहित्य (गद्य, पद्य दोन्ही) आणि संकिर्ण (इतर सर्व साहित्य प्रकार) या साहित्य प्रकारांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत. उत्कृष्ट साहित्य प्रकारासाठी शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व रोख रक्कम तर विशेष साहित्य प्रकारासाठी शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप असेल.
लेखक, प्रकाशक यांनी दि. 1 जानेवारी 2024 ते 30 नोव्हेंबर 2024 या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या दोन प्रती व लेखकाचा अल्पपरिचय 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत पोहोचतील अशा रितीने फक्त पोष्टाद्वारे डॉ. मा. ग. गुरव, अध्यक्ष, अक्षरसागर साहित्य मंच, मु. पो. वाघापूर, ता. भुदरगड जि. कोल्हापूर – 416209 (मो. 9421114264 / 9850393996) या पत्यावर पाठवावीत. असे आवाहन करण्यात आले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा
